शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-ट्रेडिंग’चा शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:06 IST

सांगली : विदर्भातही बाजार समित्या कार्यरत असल्या तरी, त्यांची उलाढाल सांगली बाजार समितीएवढी नाही. शेतकºयांच्या विश्वासामुळेच येथील व्यवहार वाढत आहेत. त्यात शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ई-ट्रेडिंग व ई-पेमेंट प्रणालीमुळे कृषी क्षेत्रातील व्यवहारात पारदर्शकता आली आहे. ही प्रणाली प्रभावीपणे कार्यरत असल्याने शेतकºयांना याचा फायदा होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर ...

सांगली : विदर्भातही बाजार समित्या कार्यरत असल्या तरी, त्यांची उलाढाल सांगली बाजार समितीएवढी नाही. शेतकºयांच्या विश्वासामुळेच येथील व्यवहार वाढत आहेत. त्यात शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ई-ट्रेडिंग व ई-पेमेंट प्रणालीमुळे कृषी क्षेत्रातील व्यवहारात पारदर्शकता आली आहे. ही प्रणाली प्रभावीपणे कार्यरत असल्याने शेतकºयांना याचा फायदा होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी येथे केले.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सहकार भवनमध्ये आयोजित सत्कार समारंभात अहिर बोलत होते. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. मोहनराव कदम, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.अहिर पुढे म्हणाले की, काळाच्या बरोबर बदलण्यासाठी व शेतकºयांचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. शासनाच्या ई-ट्रेडिंग, ई-पेमेंट यासारख्या पारदर्शी योजना राबविल्या जात आहेत. यामुळे थेट लाभ शेतकºयांना होत आहे.सांगली बाजार समितीच्या उलाढालीबद्दल आश्चर्य व्यक्त करत ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीचा वार्षिक नफा १८ कोटींचा व ठेवी ४५ कोटींच्या आहेत. ही गोष्ट कृषी क्षेत्रासाठी आश्वासक आहे. विदर्भात बाजार समित्यांचे जाळे असताना एकही बाजार समिती सांगलीएवढी सक्षम नाही.खा. संजयकाका पाटील म्हणाले की, सांगली बाजार समिती हळद, बेदाणा व गुळासाठी देशभर प्रसिध्द आहे. हा लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बाजार समितीत सचिव प्रकाश पाटील यांचे योगदान आहे. निवृत्तीनंतरही त्यांच्या अनुभवाचा फायदा बाजार समितीला होईल.राज्यमंत्री अहिर यांच्याहस्ते सचिव प्रकाश पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विक्रम सावंत, दीपक शिंदे-म्हैसाळकर, तानाजी पाटील, जीवन पाटील, दादासाहेब कोळेकर, सुभाष खोत, दीपक शिंदे, कुमार पाटील, बाळासाहेब बंडगर, वसंतराव गायकवाड, एन. एम. हुल्याळकर आदी उपस्थित होते.शेती व्यवसाय आता प्रतिष्ठेचाअहिर म्हणाले की, पूर्वी शेती हा कमीपणाचा व्यवसाय समजला जात असे. आता मात्र, आपल्या शेतीमालाला जगभरातून मागणी आहे. तांदूळ, गहू उत्पादनात देश समृध्द झाला आहे. त्याच पध्दतीने देश तूर उत्पादनातही आघाडीवर आहे. येत्या काही दिवसात देशातील शेतीमालाला अधिक महत्त्व येणार असल्याने शेतीला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे.