शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

‘ई-ट्रेडिंग’चा शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:06 IST

सांगली : विदर्भातही बाजार समित्या कार्यरत असल्या तरी, त्यांची उलाढाल सांगली बाजार समितीएवढी नाही. शेतकºयांच्या विश्वासामुळेच येथील व्यवहार वाढत आहेत. त्यात शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ई-ट्रेडिंग व ई-पेमेंट प्रणालीमुळे कृषी क्षेत्रातील व्यवहारात पारदर्शकता आली आहे. ही प्रणाली प्रभावीपणे कार्यरत असल्याने शेतकºयांना याचा फायदा होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर ...

सांगली : विदर्भातही बाजार समित्या कार्यरत असल्या तरी, त्यांची उलाढाल सांगली बाजार समितीएवढी नाही. शेतकºयांच्या विश्वासामुळेच येथील व्यवहार वाढत आहेत. त्यात शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ई-ट्रेडिंग व ई-पेमेंट प्रणालीमुळे कृषी क्षेत्रातील व्यवहारात पारदर्शकता आली आहे. ही प्रणाली प्रभावीपणे कार्यरत असल्याने शेतकºयांना याचा फायदा होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी येथे केले.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सहकार भवनमध्ये आयोजित सत्कार समारंभात अहिर बोलत होते. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. मोहनराव कदम, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.अहिर पुढे म्हणाले की, काळाच्या बरोबर बदलण्यासाठी व शेतकºयांचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. शासनाच्या ई-ट्रेडिंग, ई-पेमेंट यासारख्या पारदर्शी योजना राबविल्या जात आहेत. यामुळे थेट लाभ शेतकºयांना होत आहे.सांगली बाजार समितीच्या उलाढालीबद्दल आश्चर्य व्यक्त करत ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीचा वार्षिक नफा १८ कोटींचा व ठेवी ४५ कोटींच्या आहेत. ही गोष्ट कृषी क्षेत्रासाठी आश्वासक आहे. विदर्भात बाजार समित्यांचे जाळे असताना एकही बाजार समिती सांगलीएवढी सक्षम नाही.खा. संजयकाका पाटील म्हणाले की, सांगली बाजार समिती हळद, बेदाणा व गुळासाठी देशभर प्रसिध्द आहे. हा लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बाजार समितीत सचिव प्रकाश पाटील यांचे योगदान आहे. निवृत्तीनंतरही त्यांच्या अनुभवाचा फायदा बाजार समितीला होईल.राज्यमंत्री अहिर यांच्याहस्ते सचिव प्रकाश पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विक्रम सावंत, दीपक शिंदे-म्हैसाळकर, तानाजी पाटील, जीवन पाटील, दादासाहेब कोळेकर, सुभाष खोत, दीपक शिंदे, कुमार पाटील, बाळासाहेब बंडगर, वसंतराव गायकवाड, एन. एम. हुल्याळकर आदी उपस्थित होते.शेती व्यवसाय आता प्रतिष्ठेचाअहिर म्हणाले की, पूर्वी शेती हा कमीपणाचा व्यवसाय समजला जात असे. आता मात्र, आपल्या शेतीमालाला जगभरातून मागणी आहे. तांदूळ, गहू उत्पादनात देश समृध्द झाला आहे. त्याच पध्दतीने देश तूर उत्पादनातही आघाडीवर आहे. येत्या काही दिवसात देशातील शेतीमालाला अधिक महत्त्व येणार असल्याने शेतीला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे.